सर्वोच्च न्यायालयात उस्मानाबाद नामांतराची याचिका फेटाळली औरंगाबादची नाही - अॅड एस.एस.काझी

 0
सर्वोच्च न्यायालयात उस्मानाबाद नामांतराची याचिका फेटाळली औरंगाबादची नाही - अॅड एस.एस.काझी

सर्वोच्च न्यायालयात उस्मानाबाद नामांतराची याचिका फेटाळली औरंगाबादची नाही - अॅड एस.एस.काझी

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) औरंगाबादचे नामांतर सरकारने छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात मुख्य याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी बाॅम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी हे प्रकरण बोर्डावर आलेले नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. आज उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्याच्या विरोधातील याचिका फेटाळली आहे. आज काही माध्यमांवर औरंगाबादची याचिका फेटाळली गेली अशा खोट्या बातम्या दाखवले जात आहे याबद्दल जेष्ठ वकील एस.एस.काझी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबद्दल भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow