सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले - अंबादास दानवे

 0
सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले - अंबादास दानवे

सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले...

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

वैजापूर, दि.9(डि-24 न्यूज) सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले असल्याचा गंभीर आरोप 

शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. वैजापूर तालुक्यातील मनुर व परसोडा येथील गावकऱ्यांशी आज ९ जून रोजी दानवे यांनी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या क्या हुआ तेरा वादा? जन आंदोलन अंतर्गत संवाद चालू असताना हे वक्तव्य केले. 

सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ 'बाजार गप्पा' ठरले आहे. शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकाचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाल्याची भुमिका दानवे यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. 

बहिणीचे लाड' हा केवळ फास ठरला आहे. लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम सोडाच, पण आहे ती रक्कमही वेळेत देण्यास सरकार तयार नाही. तब्बल आठ लाख महिलांच्या लाभावर फुली मारून सरकारने विश्वासघात केला आहे. 'उज्वला गॅस योजना' कोणत्या अडगळीत पडली आहे, हे सरकारलाही माहिती नाही. 'दीड हजार देतो ना.. मग काही मागू नका..' अशा अविर्भावात मंत्री वागत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. 

याप्रसंगी अनिल चोरडिया, तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, शहर प्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, तालुका संघटक मनोज पाटील गायके, युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे, अनिल नाव्हले, अक्षय साठे, अरुण शेलार, रमेश सावंत, राजू साळुंखे,बाळू बडक,नंदकिशोर पाटील जाधव, रमेश सावंत दादासाहेब आव्हाळे, भगवान इंगळे,

संतोष साळुंखे, कल्याण बोडखे, भानुदास पिंपळे, अरुण पवार व श्रीमान गायके उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow